Pages

Saturday, May 17, 2014

पु.लं. चे काही किस्से ...

१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !

२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी
ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून
द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर
पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना
शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या
खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या
सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"

५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी
पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून
महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या
आयुष्यात आला होता."

६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ
वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार
? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या
पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस."

८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची
कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास
नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी
बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल.
थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या
कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही
आहे,मग निर्मीतिस काय कमी?

१०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही
समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.

११) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते
म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

१२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे
छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून
म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

१३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी
बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत
उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत
थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला.
लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले,
'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला
आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

१४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून
कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र
बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी
असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम
ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी
काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते.
तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर
संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

१५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु
लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

१६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा
समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही
तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही
म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

१७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना
दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार
मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर
त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला
माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड
वांग्याचे आहे."

हास्यरंग - (मराठी विनोद)

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.



कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!




कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.




प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!




एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "




रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…




पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)





मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..




'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?




कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,

मॅडम तुमची हि साडी परत ह्या,

मॅडम : अरे पण का?
...
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...




दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
"आयच्या आयची आय ब्यांक "






संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.






पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.




मराठी भाषा...!!

मराठी भाषा फारच अजब आहे ना...??
.
...गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.......




एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??



बायकॊला "बडबड बंद कर" असं कधीच न सांगता
"ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस" म्हणा.

Saturday, May 10, 2014

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांचीमाणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, आमीर खान, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं. मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’जगत राहायची उर्जा देत राहील !

Thursday, May 17, 2012

उखाने




















Saturday, April 30, 2011

मराठी चुटकुले


ऊंची !

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?

तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.

मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"

अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."

प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."

मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.


गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !


~ ~ ~ * ~ ~ ~

मैत्री.

सांता ने नविन मोबाईल घेतला.

त्याच्या मित्रांनी मिठाई मागितली.

सांता बाजारात गेला. त्याच्याकडे फार पैसे नव्हते.


त्याने मोबाईल विकला.


आणि मित्रांना मिठाई खाऊ घातली .


~ ~ ~ * ~ ~ ~

पैसा.

माणसाच्या आयुष्यात पैसा सर्व काही नाही.



विसा आणि मास्टर कार्ड आहेत ना !

~ ~ ~ * ~ ~ ~

बाळूचा अभ्यास.

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.

असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?


बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

~ ~ ~ * ~ ~ ~

खोकला !

बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?

सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.

बांता : काळजी नको करु, एक दिवस श्वासही थांबेल.


~ ~ ~ * ~ ~ ~


जन्म.

बांता : ऑक्सिजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.

सांता : अरे देवा, बरं झाल माझा जन्म त्यापुर्वी नाही झाला.


~ ~ ~ * ~ ~ ~

अशक्य !

गुरुजी : बाळू, तु एखादे असे काम करू शकतोस का जे इतरांना अशक्य आहे ?



बाळू : हो सर, मी माझे अक्षर वाचू शकतो.


~ ~ ~ * ~ ~ ~

आजार ?

डॉक्टर : तुम्हाला मलेरिया झाला आहे.

रुग्ण : डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना ? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.

डॉक्टर : नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.


~ ~ ~ * ~ ~ ~


पेपर !

बाबा : काय रे बाळू, आजचा पेपर कसा होता ?

बाळू : बाबा, प्रश्न तसे सोपे होते पण त्यांची उत्तरे फार कठिण होती.


~ ~ ~ * ~ ~ ~

सुंदर बाई !

नवरा घरी आल्यावर....

बायको : अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.

नवरा : मग काय केल तु ?

बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.


~ ~ ~ * ~ ~ ~

डॉक्टर सांता.

डॉक्टर सांताने फार गंभीर चेहरा करुन हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जिभ बघितली, कान तपासले आणी.........











बराच विचार करुन म्हणाला..........











टॉर्च चांगला आहे !!!


~ ~ ~ * ~ ~ ~

लाच.

वकिल रागारागाने पक्षकाराकडे गेला.

वकिल : अरे तु आपल्या न्यायामूर्तींकडे लाच पाठवलीस ?

पक्षकार : होय.

वकिल : तुला माहित आहे ते कसे आहेत ? त्यांना हे आवडणार नाही.

पक्षकार : होय.

वकिल : तरिही तु अस का केलस ? आपण आता हरणार.

पक्षकार : नाही, मी लाच आपल्या विरोधी पक्षाच्या नावे पाठवली !!!


~ ~ ~ * ~ ~ ~

लक्ष !

शिक्षक : बाळू, वर्गात थोड लक्ष देतोस का ?

बाळू : सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.


~ ~ ~ * ~ ~ ~

बाप रे !

अरे तुला रडायला काय झालं ?

तो हत्ती आज मेला.

तर काय तो हत्ती तु पाळलेला होता कां ?

नाही, त्याला पुरायला खड्डा खणायला मला सांगण्यात आलय.


~ ~ ~ * ~ ~ ~


स्वप्ने बघा !


बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.

राजु : हो बाबा.

बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?

राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.


~ ~ ~ * ~ ~ ~

ब्रेक ?

बांता : अरे सांता, तु कार इतक्या वेगात का चालवतो आहेस ?

सांता : अरे कारचे ब्रेक फेल झालेत. मला वाटते लौकरच घरी पोहचलेल बर.


~ ~ ~ * ~ ~ ~

प्रार्थना.

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?

राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.


~ ~ ~ * ~ ~ ~

सांताचा विमान प्रवास.

सांताला दिल्लीहून तातडीने अमृतसरला जायचे होते.

बर्‍याच जणांना विचारल्यावर सांता विमानाने जायचे ठरवतो.

विमानाने त्याचा पहिलाच प्रवास असल्याने तो थोडा अस्वस्थच असतो.

सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो विमानातली आपली जागा पकडतो.

खिडकी मिळाल्याने सांता आनंदात असतो.

सांता खिडकीतुन बाहेर बघत असतो.

विमान सुटते.

धावपट्टीवर धावायला लागते.

सांता आपल्या जागेवरुन उठतो व कॉकपिट मध्ये जावून पायलटच्या काना खाली दोन ठेवतो.

कारण ?

?

?

?

?

?

?

त्याला वाटते पायलट ते विमान रस्त्याने नेणार आहे !


~ ~ ~ * ~ ~ ~


मैत्री !

सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?

नरेश : हो, देईन ना .

सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?

नरेश : हो. का नाही.

सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?

नरेश : नाही.

सुरेश : का नाही ?

नरेश : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!


~ ~ ~ * ~ ~ ~


सरदार !

तुमचा एक मित्र सरदार आहे.

बर.

त्याला शनिवारी हसवायचे आहे.

तुम्ही काय कराल.

.

.

.

.

.

.

.

.

.

विचार करा

.

.

.

.

.

त्याला मंगळवारी जोक सांगा !!!!!


~ ~ ~ * ~ ~ ~


रेडिओ - एफएम

संता :- डॉक्टर माझा मित्र स्वतःला रेडिओ समजतो आहे.

डॉक्टर :- तुम्ही काळजी करू नका मी त्यांचा इलाज करतो.

संता :- अहो मी काळजी करत नाहीये, फक्त तूम्ही असं काही करा की तो एफएम पकडेल.

~ ~ ~ * ~ ~ ~


हत्तीचे डासिणीवर प्रेम…

हत्तीचं डासिणीवर
एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला…. का?….

.
.
.

सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ”बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!”

~ ~ ~ * ~ ~ ~


सरदारजीला धमकी

सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -

सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी - साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.

~ ~ ~ * ~ ~ ~

स्वयंपाक

बायको : अहो,काल तो भिकारी आला होता ना, तो मला अजिबात आवडला नाही.

नवरा : का ? काय केलं त्याने ?

बायको : काल मी त्याला चांगल भरपूर खायला दिलं,आज तो परत आला आणि तो मला हे “स्वयंपाक चांगला कसा करावा” पुस्तक देवून गेला.

~ ~ ~ * ~ ~ ~

घरजावई

पुजा - कायं गं लग्न करून घरजावई केल्यामुळे मजा येत असेल. चांगला धाक असेल. तुझ्या नव-यावर?
सुशिला - कुठला गं, उलट तेच माझ्यावर धाक दाखवतात, छोट्याशा गोष्टीवरून तेच माहेरी जायला निघतात.

~ ~ ~ * ~ ~ ~

सिंह आणि ससा हॉटेल मधे

एकदा एक सिंह आणि एक ससा हॉटेल मधे सोबत जातात.

वेटर दोघांनाही बसायला जागा देतो. सशाला विचारतो, ” सर, तुम्हाला खायला काय आणु “?

ससा सिंहासमोर ऎटीत सांगतो, ” माझ्यासाठी एक प्लेट गाजर आण, बघ चांगले हवेत. ”

वेटर घाबरत सिंहाकडॆ बघतो आणि विचारतो, ” सर, तुम्हाला काय आवडेल ?”

ससा त्याला सांगतो, ” त्यांना आज काहीही नको. ”

वेटर, ” कां ? त्यांना भूक नाही कां ?”

ससा, ” अरे, त्यांना भूक असती तर तुला काय वाटते मी इथे राहिलो असतो कां “?

~ ~ ~ * ~ ~ ~


सोपा मार्ग

दोन भिकार्‍याचा संवाद

पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.

दुसरा : काय नाव आहे त्याच ?

पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.

दुसरा : तर तु भिक का मागतोस ?

पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.

~ ~ ~ * ~ ~ ~

आई


आईमुळेच आपल्यास अस्तित्व लाभे.
तिच्याच आशीर्वादाने जीवन सफल उभे.
तिच्यासारखे दैवत नाही जगती.
आईची काय सांगावी महती.

सर्व अपराध पोटात घेई.
बदल्यात प्रेमाचा सागर देई.
तिच्या वात्सल्याची आहे जगात कीर्ती.
आईची काय सांगावी महती.

आईत देव वसतो मूर्तिमंत.
कुठे देव पाहू ही नसावी खंत.
हिच्या सानिध्यात ना कशाची भीती.
आईची काय सांगावी महती.

आई लाभने , भाग्य मोठे.
समोर तिच्या ब्रम्हांड खोटे.
तिच्यासमोर पडती फिकी सर्व नाती. आईची काय सांगावी महती.

वर्णन करण्या तिचे शब्द पडती थिटे जसे.
आई हेच एक प्रेमाचं महन्मंगल काव्य असे.
भले भले तिच्या गुणांचे पोवाडे गाती.
आईची काय सांगावी महती.

शेवटी तिची सेवा हाच धर्म मानवा.
तिच्या अनंत उपकारांचा विसर ना पडावा.
अखंड सेवेत जागवाव्या राती.
आईची काय सांगावी महती.


आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही 
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही, 
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!